संवाद
DAY 28/30/28/JUNE/2020 कवी सुधीर मोघे ह्यांची ही एक सुंदर कविता. दोन माणसांमधील नाते बांधायला खरच काय लागतं. सर्वात महत्वाचा म्हणजे दोघांमधला समजूतदार पणा, एकमेकांबद्दल आदर, प्रेम, विश्वास,आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही बघण्याची क्षमता. जर ह्या चार गोष्टी जमल्या तर नातं जुळायला आणि टिकायला काहीच अवघड नाही. नात्यांची अजून एक गरज असते, जी कालांतराने दृढ होत जाते, ती म्हणजे, बोललेले तर समजणे, पण न बोललेही कळणे. आणि इतर गोष्टी जरी यथायोग्य असल्या तरी माझ्या मनातलं, तुला न सांगता कळणं हे प्रेमाचे पराकोटीचे असण्याचा एक पुरावा. ह्याच एकामुद्द्यावरून जोडप्यांमध्ये, भागीदारांमध्ये, किंवा कुठल्याही दोन माणसांमध्ये वाद, तंटा, मतभेद, किंवा अगदी तफावत ही होऊ शकते. त्यामुळे शब्दांच्या पालिकडलिही एक भाषा आहे जी नात्यात रुळणे गरजेचे असते. अश्या कळण्याच्या प्रवासाबद्दलच कवी म्हणतो, की तू न बोलता ही मला समजतं, तुला काय म्हणायचं. त्यासाठी, देहबोली, एखादा कटाक्ष, एखादा उसासा, एखादा हुंदकाच पुरेसा असतो. हे कळतात म्हणजे ती एक तपश्चर्याच आहे. चार चौघात, एकमेकांचे हसं हाऊ न देता व इतरा...